ही संहिता एका अधिभौतिक दृष्टिकोनातून मानवी अस्तित्वाचा तपास घेते. आपल्या सुप्त इच्छा, श्वापदी हेतू, टोकाची स्वप्ने आणि ताणलेले मानवी संबंध ह्यांकडे एका वेगळ्या प्रकाशात पाहण्यास आपणांस प्रवृत्त करते.
तीन मान्यवर साहित्यिकांनी लिहिलेल्या कथा, लेख आणि टिपणांतून आपल्याला 'घरां'कडे पाहण्याची एक अनोखी दृष्टी मिळते. हे दर्जेदार साहित्य माणूस आणि घर ह्यांतील अतूट नात्याचा अर्थ अधोरेखित करते.